- ना.रा.खराद
प्रत्येक वस्तू प्रमाणे माणसाचीही दूसरी बाजू असते.नाण्याप्रमाणे माणसाची देखील एकच
बाजू आपल्या समोर असते.आपण एकच बाजू बघतो किंवा एकच दिसते.तराजूचे जसे दोन्ही पारडे समान असल्याविना योग्य वजन होत नाही तसेच माणसांच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय त्याचे योग्य मूल्यमापन होत
नाही.एक बाजू कधी मुद्दाम झाकोळली जाते तर एक बाजू मुद्दामच उघडी केली जाते
आपणास राग दिसतो, परंतु त्या रागामागचे प्रेम दिसतं नाही.प्रेम दिसते परंतु त्या प्रेमामागचा स्वार्थ दिसत नाही.
धमकी दिसते, त्यामागची भिती दिसत नाही.
न्यायालयात देखील दोन्ही बाजू समोर असाव्या लागतात.एकतर्फी निर्णय हा अन्यायच असतो.कधीकधी समोर चकाकणारे मागच्या बाजूने खुप काळे असते.
दिसणारी बाजू बहुदा फसवी असते. गोरा रंग
बघून कित्येक लोक फसलले असतात.गोड बोलण्यामुळे माणसे चांगली समजली जातात.
एखाद्याच्या एखाद्या वाईट गोष्टीचा इतका गाजावाजा होतो की त्याची चांगली बाजू झाकोळली जाते.अनेक चांगल्या समजल्या गेलेल्या लोकांची काळी बाजू समोर येते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते.
एखाद्याकडे एखादा गुण आहे म्हणून तो
गुणगान आहे असे नसते.एखाद्या दूर्गुंणाने तो
दूर्गुणी ठरत नाही.परीक्षेमध्ये जसे सरासरी
गुण बघितले जातात तसेच माणसाचेही मूल्यमापन व्हावयास हवे.आपणास कृति दिसते परंतु त्यामागील प्रेरणा किंवा उद्देश दिसत नाही.
वरुन चांगले दिसणारे सफरचंद आतून सडके
निघते.टरबूज तर कापल्याविना कळत नाही.
पाय दाबणारे, गळ्यापर्यंत कधी पोहोचतील
सांगता येत नाही.सेवा करणारे कसा मेवा मागतात हे आपण बघतोच. दूसरी बाजू तपासल्यानंतरच आपले मत बनवले पाहिजे.
अभिप्राय किंवा प्रतिक्रिया तात्काळ देऊ नये.
सगळे धोके दूसरी बाजू न तपासल्याने मिळतात.दिसते तेच किंवा तितकेच खरे,हे खरे नसते.किंबहुना ते खोटेच असू शकते.
एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा आहे, म्हणून तो सर्वच बाबतीत मागे आहे का, हे बघितले पाहिजे.एखादी स्कीम एका बाजूने चांगली असू शकते, परंतु दूसरी बाजू नुकसान करु शकते का हे तपासले पाहिजे.कुणाबद्दलचे एखाद्याचे मत वेगळे आणि दुसऱ्याचे वेगळे असू शकते.
फक्त समोरुन नाही तर मागून बघितले पाहिजे, फक्त खालून किंवा वरुन नाही तर सर्व बाजूंनी बघितले पाहिजे तरच वस्तू किंवा माणसाचे खरे आकलन होऊ शकते.
दूसरी बाजू उपेक्षित ठेवल्याने आपणास माणसे ओळखत येत नाहीत,हे न ओळखता येणे अविवेकी आहे आणि अविवेकीपणा काय असतो हे सर्वांना ठाऊकच आहे.
प्रत्येक वस्तू प्रमाणे माणसाचीही दूसरी बाजू असते.नाण्याप्रमाणे माणसाची देखील एकच
बाजू आपल्या समोर असते.आपण एकच बाजू बघतो किंवा एकच दिसते.तराजूचे जसे दोन्ही पारडे समान असल्याविना योग्य वजन होत नाही तसेच माणसांच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय त्याचे योग्य मूल्यमापन होत
नाही.एक बाजू कधी मुद्दाम झाकोळली जाते तर एक बाजू मुद्दामच उघडी केली जाते
आपणास राग दिसतो, परंतु त्या रागामागचे प्रेम दिसतं नाही.प्रेम दिसते परंतु त्या प्रेमामागचा स्वार्थ दिसत नाही.
धमकी दिसते, त्यामागची भिती दिसत नाही.
न्यायालयात देखील दोन्ही बाजू समोर असाव्या लागतात.एकतर्फी निर्णय हा अन्यायच असतो.कधीकधी समोर चकाकणारे मागच्या बाजूने खुप काळे असते.
दिसणारी बाजू बहुदा फसवी असते. गोरा रंग
बघून कित्येक लोक फसलले असतात.गोड बोलण्यामुळे माणसे चांगली समजली जातात.
एखाद्याच्या एखाद्या वाईट गोष्टीचा इतका गाजावाजा होतो की त्याची चांगली बाजू झाकोळली जाते.अनेक चांगल्या समजल्या गेलेल्या लोकांची काळी बाजू समोर येते तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते.
एखाद्याकडे एखादा गुण आहे म्हणून तो
गुणगान आहे असे नसते.एखाद्या दूर्गुंणाने तो
दूर्गुणी ठरत नाही.परीक्षेमध्ये जसे सरासरी
गुण बघितले जातात तसेच माणसाचेही मूल्यमापन व्हावयास हवे.आपणास कृति दिसते परंतु त्यामागील प्रेरणा किंवा उद्देश दिसत नाही.
वरुन चांगले दिसणारे सफरचंद आतून सडके
निघते.टरबूज तर कापल्याविना कळत नाही.
पाय दाबणारे, गळ्यापर्यंत कधी पोहोचतील
सांगता येत नाही.सेवा करणारे कसा मेवा मागतात हे आपण बघतोच. दूसरी बाजू तपासल्यानंतरच आपले मत बनवले पाहिजे.
अभिप्राय किंवा प्रतिक्रिया तात्काळ देऊ नये.
सगळे धोके दूसरी बाजू न तपासल्याने मिळतात.दिसते तेच किंवा तितकेच खरे,हे खरे नसते.किंबहुना ते खोटेच असू शकते.
एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा आहे, म्हणून तो सर्वच बाबतीत मागे आहे का, हे बघितले पाहिजे.एखादी स्कीम एका बाजूने चांगली असू शकते, परंतु दूसरी बाजू नुकसान करु शकते का हे तपासले पाहिजे.कुणाबद्दलचे एखाद्याचे मत वेगळे आणि दुसऱ्याचे वेगळे असू शकते.
फक्त समोरुन नाही तर मागून बघितले पाहिजे, फक्त खालून किंवा वरुन नाही तर सर्व बाजूंनी बघितले पाहिजे तरच वस्तू किंवा माणसाचे खरे आकलन होऊ शकते.
दूसरी बाजू उपेक्षित ठेवल्याने आपणास माणसे ओळखत येत नाहीत,हे न ओळखता येणे अविवेकी आहे आणि अविवेकीपणा काय असतो हे सर्वांना ठाऊकच आहे.